Close

एन. आय. सी.

इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) अंतर्गत राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान केंद्र (NIC) भारत सरकारचा तंत्रज्ञान भागीदार आहे. NIC ची स्थापना 1976 मध्ये केंद्र आणि राज्य सरकारांना तंत्रज्ञान-आधारित उपाय प्रदान करण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती. एनआयसी, आपल्या आयसीटी नेटवर्क “एनआयसीनेट” मार्फत, केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालये/विभाग, राज्ये/संघ राज्ये आणि भारतातील जिल्हा प्रशासनांसोबत संस्थात्मक संबंध ठेवते. एनआयसीने केंद्र, राज्य, जिल्हे आणि ब्लॉक्समधील सरकारच्या मंत्रालये/विभागांमध्ये ई-गव्हर्नमेंट/ई-गव्हर्नन्स अनुप्रयोग सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे, ज्यामुळे सरकारी सेवांमध्ये सुधारणा, अधिक पारदर्शकता, केंद्रीकरण न करता योजना आणि व्यवस्थापनाला प्रोत्साहन मिळून भारतातील लोकांसाठी अधिक कार्यक्षमता आणि उत्तरदायित्वाचे परिणाम मिळाले.

जिल्हा पातळीवर, एनआयसी जिल्हा केंद्राने जिल्ह्यातील विविध राज्य / केंद्र शासकीय विभागांना प्रभावी माहिती देणे, तांत्रिक सहाय्य प्रदान केले आहे. तांत्रिक सेवा आणि प्रशिक्षण व्यतिरिक्त, विविध केंद्रांमधील ई-गव्हर्नन्स ऍप्लिकेशनच्या अंमलबजावणीमध्ये ही केंद्रे देखील महत्त्वाची भूमिका बजावतात.

एन. आय. सी. रत्नागिरी जिल्हा केंद्र

पत्ता – जिल्हाधिकारी, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र राज्य, भारत पिन: 415 612 दूरध्वनी: ईमेल: mahrat[at]nic[dot]in