इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) अंतर्गत राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान केंद्र (NIC) भारत सरकारचा तंत्रज्ञान भागीदार आहे. NIC ची स्थापना 1976 मध्ये केंद्र आणि राज्य सरकारांना तंत्रज्ञान-आधारित उपाय प्रदान करण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती. एनआयसी, आपल्या आयसीटी नेटवर्क “एनआयसीनेट” मार्फत, केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालये/विभाग, राज्ये/संघ राज्ये आणि भारतातील जिल्हा प्रशासनांसोबत संस्थात्मक संबंध ठेवते. एनआयसीने केंद्र, राज्य, जिल्हे आणि ब्लॉक्समधील सरकारच्या मंत्रालये/विभागांमध्ये ई-गव्हर्नमेंट/ई-गव्हर्नन्स अनुप्रयोग सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे, ज्यामुळे सरकारी सेवांमध्ये सुधारणा, अधिक पारदर्शकता, केंद्रीकरण न करता योजना आणि व्यवस्थापनाला प्रोत्साहन मिळून भारतातील लोकांसाठी अधिक कार्यक्षमता आणि उत्तरदायित्वाचे परिणाम मिळाले.
जिल्हा पातळीवर, एनआयसी जिल्हा केंद्राने जिल्ह्यातील विविध राज्य / केंद्र शासकीय विभागांना प्रभावी माहिती देणे, तांत्रिक सहाय्य प्रदान केले आहे. तांत्रिक सेवा आणि प्रशिक्षण व्यतिरिक्त, विविध केंद्रांमधील ई-गव्हर्नन्स ऍप्लिकेशनच्या अंमलबजावणीमध्ये ही केंद्रे देखील महत्त्वाची भूमिका बजावतात.
एन. आय. सी. रत्नागिरी जिल्हा केंद्र
पत्ता – जिल्हाधिकारी, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र राज्य, भारत पिन: 415 612 दूरध्वनी: ईमेल: mahrat[at]nic[dot]in