Close

जिल्ह्याविषयी

रत्नागिरी हि लोकमान्य टिळकांची जन्मभूमी तसेच भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे, भारतरत्न पांडुरंग वामन काणे, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची ही भूमी. तसेच ब्रिटीश सरकारने रत्नागिरी येथे बंदिवासात ठेवलेल्या स्वातंत्रयवीर विनायक दामोदर सावरकर सारख्या महापुरुषामुळे रत्नागिरी जिल्हा पावन झाला आहे. रत्नागिरी हे भारतातील पश्चिम किनारपट्टीत वसलेले महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्यात असंख्य किनारे, खाडी, समुद्र किल्ले, बंदरं , गरम पाण्याचे झरे, लेणी, मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळे, निसर्गरम्य स्थळे आहेत.